-->
करमाळाकृषी विषयक

वादळ व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार संजयमामा शिंदे यांचे कडून पाहणी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

दिनांक २८ एप्रिल रोजी अचानक उद्भवलेल्या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यातील अनेक गावातील केळी, पपई, आंबा, लिंबोणी आदी फळबागां बरोबरच तरकारी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते. वादळात झाडे अंगावर पडून काही जनावरे ही मृत झालेली होती. आज १ मे रोजी देवळाली व खडकेवाडी येथील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केली. त्यांचे समवेत प्रभारी तहसीलदार श्री विजयकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

 

शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी दुपारनंतर करमाळा तालुक्यातील चिखलठाण, शेटफळ, वाशिंबे, उमरड, देवळाली, सरपडोह आदी जवळपास ३० ते ३५ गावांमध्ये वादळामुळे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. संपूर्ण तालुक्यातील नुकसानीचा सर्वे करून त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे अशा सूचना आमदार शिंदे यांनी यावेळी दिल्या.

 

याप्रसंगी सुजित तात्या बागल, बाळनाथ जगदाळे, माजी सरपंच आशिष गायकवाड, सरपंच गहिनीनाथ गणेशकर, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे, चेअरमन रामभाऊ रायकर, संजय कानगुडे, प्रभारी तहसीलदार जाधव साहेब, तालुका कृषी अधिकारी वाकडे साहेब, सर्कल राउत साहेब, तलाठी शितल सूर्यवंशी मॅडम, ग्रामसेवक श्रीधर नागरसे, कृषी सहाय्यक महेश रांजुण व देवळाली, खडकेवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close