-->
करमाळामाहिती विषयकसामाजिक

अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी तालुक्यातून हजारो समाजबांधव जाणार- विलास दादा पाटील

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

धनगर समाजाचे आराध्य दैवत अहिल्याबाई होळकर जयंती साठी दिनांक ३१ मे रोजी करमाळा तालुक्यातून १५० गाड्यांच्या माध्यमातून हजारो समाजबांधव जाणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य विलास दादा पाटील यांनी शासकीय विश्रामगृह करमाळा येथे आयोजित केलेल्या समाजबांधवांच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

 

 

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अहिल्याबाई होळकर या आमच्या धनगर समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. तालुक्यामधून दरवर्षी त्यांच्या जयंतीसाठी हजारो समाजबांधव त्यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी ता. जामखेड या ठिकाणी जात असतात. या समाजबांधवांना चौंडी या ठिकाणी जाता यावं यासाठी १५० गाड्यांची व्यवस्था केलेली असून त्याचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी अनिल शेजाळ- ९५९५६७०४४४, अशोक पाटील- ९४२१०६३३०७, प्रकाश थोरात- ९३७३८५१८४८, संग्राम पाटील- ८८३०६७१६७४ व वैभव कोकरे- ७७८५८४८४८४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

 

 

अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या आजच्या समाजबांधवांच्या बैठकीसाठी जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक अशोक पाटील, विलास पाटील, अनिल पाटील, अनिल शेजाळ, प्रकाश थोरात, जालिंदर कोकरे, वैभव कोकरे, दीपक मारकड, दादा नरोटे, राहुल चोरमले, लाला काळे, भाऊसाहेब खरात, समाधान भोगे, हिराजी कोंडलकर, नागा पाटील, आदेश बंडगर, संभाजी कोळेकर, किरण तरंगे, अशोक तरंगे, परमेश्वर श्रीरामे, भारत केसकर, अनिल वाघमोडे, बबन कावळे, एन.जी. हाके आदीसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close