-->
राज्यसामाजिक

परवानगी नाकारली तरी ४ जुलै रोजी मराठा समाजाचा सोलापुरात उग्र मोर्चा काढणारच: नरेंद्र पाटील

 

 

कोल्हापूरनंतर आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा राज्यातील सर्वात मोठा मोर्चा असणार आहे. तर याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रास्ता रोको आंदोलन ही करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांची परवानगी नाही मिळाली तरी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना भेटून पत्रं देण्यात येणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये मराठा समाजाबरोबर शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कोल्हापूरनंतर आता सोलापुरात मराठा समाजाचा मोर्चा निघणार असल्यामुळे सर्वाच्याच नजरा या मोर्च्याकडे आहेत.

या मोर्चाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. मोर्चाची मोर्चेबांधणी करण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मोर्चाचे नेतृत्व मराठा समाजाचे नेते, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील करणार आहेत. त्याचबरोबर या मोर्चासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, खासदार नारायण राणे, शिवेंद्र राजे भोसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी प्रमुख नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.

मूक मोर्चा काढून काहीही होत नाही. त्यामुळे हा उग्र मोर्चा असणार आहे. कारण आक्रमक झालो तरच महाविकास आघाडी सरकार दखल घेईल, अन्यथा दखल घेतली जाणार नाही. मराठा समाज लढवय्या समाज असल्याने आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील, सोलापूर जिल्हा समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, प्रताप कांचन आदी नेते उपस्थित होते.

मोर्चासाठीची तयारी म्हणून असा असेल सोलापूर जिल्हा दौरा
२८ जून रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणार
२९ जुलै रोजी माळशिरस, माढा, कुर्डुवाडीला भेट देऊन समाजामध्ये जनजागृती करणार
३० जून रोजी बार्शी, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण या तालुक्यांचा दौरा करून सभा घेणार
१ जुलै रोजी अक्कलकोट दौरा करणार
२ जुलै रोजी बाईक रॅली काढण्यात येणार
मराठ्यांचा विषय आल्यावरच कोरोना येतो का??
मराठा समाजाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करणार आहोत, मराठ्यांचा विषय आला की, कोरोनाचं कारण दाखवलं जातंय. मागील वर्षी काँ ग्रेसने ट्रॅक्टर रॅली काढली होती. ते तुम्हाला कसं काय चालत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close