-->
करमाळाराजकियसामाजिक

संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा; खूपसे पाटील यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांना सूचना

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीच आत्मीयता नाही : अतुल खुपसे पाटील

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

विरोधी पक्ष जेव्हा सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता दाखवतो, पण एकदा का सत्तेत गेला की, शेतकऱ्यांबद्दल असणारी आत्मीयता नाहीशी होती आणि सत्तेच्या खुर्च्या उबवण्याचा आनंद घेतात. त्यामुळे जगाचा अन्नदाता कमजोर होतो. त्याला कोणीच आधार देत नाही. आणि तो आपल्या सारख्या संघटनेकडे आशेने पाहतो. त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी तळमळीने काम करा असे आवाहन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी केले.

 

करमाळा शासकीय विश्राम गृह येथे जनशक्ती संघटनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या पद नियुक्त्या देण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी वारकरी संप्रदाय महाराष्ट्र प्रमुख अविनाश महाराज कोडलिंगे, उपजिल्हाप्रमुख अतुल राऊत, करमाळा उपतालुकाप्रमुख वैभव मस्के, पांडूरंग भोसले, शरद एकाड, विद्यार्थी करमाळा तालुका प्रमुख रामराजे डोलारे, विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष, किशोर शिंदे, करमाळा महिला तालुका उपप्रमुख कोमल खाटमोडे, करमाळा सोशल मीडिया प्रमुख सागर शिंदे, तालुका युवा आघाडी कार्याध्यक्ष अजीज सय्यद, तालुका सरचिटणीस प्रदीप शिंदे आदी निवडी करण्यात आल्या.

या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व संघटनेची शपथ देण्यात आली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close